काय केल आंबेडकरांनी

डॉ . बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या बद्दल काही न माहित असलेल्या गोष्टी :- जगातील अव्वल प्रतिभावान मनुष्य म्हणून सम्मान ( काम्ब्रीज विद्यापीठ )- स्त्री वर्गासाठी असलेले "हिंदू कोड बिल " जेव्हा नेहरूंनी फेटाळले , तेव्हा कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि पुढे झटून बिल पास केले . पण कुठलीही स्त्री संघटना आज त्यांच्या ह्या महत्वपूर्ण योगदाना बद्दल बोलताना दिसत नाही.- रिझर्व बँक ऑफ इंडिया ची कल्पना ही बाबासाहेबंचीच (१९३४, हिल्ल्तन यंग कमिशन )- दामोदर नदी प्रकल्प , हिराकुंद प्रकल्प , सोने नदी प्रकल्प ह्या मार्फत महानदी ला नियंत्रित करण्याची कल्पना सर्वस्व बाबासाहेबंचीच पण नंतर नेहरूंनी आपली म्हणून जगासमोर आणली .- भारतीय कामगार व कर्मचारी वर्गाचे दैवत ( कामाचे तास १२ तासांवरून ८ तासांवर आणले )- Central Water Irrigation & Navigation Commission(मार्च १९४४) ची स्थापना करून भारत देशात प्रथमच " सिंचन नियोजन " सुरु केले , ज्यामुळे पुढे आपल्या देशात शेती ला चालना भेटली आणि भर भराट आली .- दुसर्या महायुद्ध नंतर पडलेली अर्थव्यवस्था ,उद्योग ,पुनर्वसन , संरक्षण ची Reconstruction Committee of Council (RCC ) मार्फत आखणी करून देशाला सावरले.- एकमेव भारतीय ज्यांचा लंडन मध्ये "कार्ल मार्क्स " सोबत फोटो आहे .- अशोक चक्र ला राष्ट्रीय तिरंगा ध्वजा मध्ये स्थान मिळवून दिले व अशोक स्तम्बाला राष्ट्रीय चिन्ह बनवण्यात महत्वपूर्ण योगदान- भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे प्रथम विरोधक- भारतीय घटनेचे शिल्पकार- भारत देशात जन्माला आलेल्या व विलीप्त होत असलेल्या बौद्ध धर्माला नवजीवन दिले.- देशातील महिला व महिला कामगारांसाठी महत्वपूर्ण योग्न्दान ( प्रोविडेंड फंड , घटस्फोट कायदा,गर्भवती कर्मचारी साठी वेतन युक्त सुट्टी व बर्याच सोयी , महिला वेतन वाढ , ESI , महिला कर्मचारी कल्याण फंड ची स्थापना , इत्यादी… )आणखी बर्याच राष्ट्र हिताच्या गोष्टीत योगदान , पण काही खोडसाळ व जातीयवादी लोकांच्या चुकीच्या प्रचारा मुले त्यांना फक्त दलितांचे नेते म्हणून ओळखलं व संबोधित केलं जातं .चला त्यांच्या ५८ व्या महापारीनिर्वानाच्या दिवशी त्यांची खरी, सच्ची व राष्ट्रहिताची प्रतिमा लोकांसमोर आणून लोकांचे बरेच गैरसमज दूर करूया.डॉ . बाबासाहेब आंबेडकर ह्यांना विनम्र अभिवादन...

No comments:

Post a Comment