मी बाबासाहेब बोलतोय


"चैत्यभूमिवरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर बोलतोय"... 

चैत्यभूमिवरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर बोलतोय, मी हिंदू धर्मात जन्माला आलो परंतु हिंदूधर्मात मरणार नाही अशी घोषणा येवले नाशिक मुक्कामी १९३५ साली करून धर्म वेड्या काल्पनिक दगडांच्या मेंदूत
सडलेल्या,जातिभेदाचा उच्छेद मांडणाऱ्या मनुवादी विचारांना लाथाडून रंजल्या गंजल्या उपेक्षित
मागासलेल्या समाजाला समतेच्या मार्गावरून चालणारा बौद्धधम्म रक्तरहित क्रांती करून १४ ऑक्टोंबर १९५६
दिला. तो महामार्ग निर्माण करण्यासाठी 
मी घोषणा केली होती की "मी सारा भारत बौद्धमय करीन " शेवटचे दोन दिवस :बुद्ध आणि धम्म" ग्रंथावर शेवटचा हात डोळे फिरवता फिरवता झोपेतच काळाने अचानक घाला घातला व माझं महानिर्वाण ६ डिसेंबर १९५६ दिल्ली येथे राहत्या घरी झालं.

नागभूमीत अर्थात नागपूर या ठिकाणी माझ्या समकालीन समाजातील अनुयायी यांना दीक्षा दिली.
त्या ठिकाणी काही तास ठेवून माझं 'शव' विमानाने मुंबईत आणलं गेलं.लाखो अनुयायी माझ्या प्रेमापोटी रस्त्याच्या दुतर्फा रांगेमधून ओक्साबोक्सी रडत होती. अश्रू देखील आवरत नव्हते. एवढे अतोनात प्रेम
करीत राजगृह येथून माझ्या अखेरच्या प्रवासाला सुरुवात झाली .
माझ्या शवाला अखेर अग्नी देण्याकरिता सुद्धा तत्कालीन महाराष्ट्र सरकारने या भूमी पुत्राला भारताच्या अधिनायक,घटनाकाराला जागा देण्याची असमर्थता दाखविली अर्थातनाकारली अखेर गुहागर
तालुक्यातील रत्नागिरी जिल्यातील सुपुत्र माझेच सहकारी मित्र बहुजन समाजातील (भंडारी) नेते सी. के.
बोले यांच्या मालकीची जागा क्षणाचा विचार न करता माझ्या अखेरच्या शरीराला सरणावर
जाळण्यासाठी सरण रचण्याची सूचना केली व मला अनुयायी यांनी सरणावर चिता रचून माझा पुत्र यशवंत
यांनी सर्वांच्या साक्षीनं बुद्धधम्माला अनुसरून अग्नी दिला.मी शांत गाढनिद्रेत आसमंतात
विरघळून गेलो.काही दिवसांनी माझ्या आठवणीचा ठेवा म्हणून माझ्या पुत्रांन व समाजातीलपुढारी, विचारवंत
मंडळीनी माझ्या अस्थींच्या माध्यमांतून "चैत्यभूमी " ची संकल्पना उभी केली.
आज जगाच्या, भारताच्या पाठीवर 'चैत्यभूमी ' ही माझ्या नावानं अस्तित्वात असून ओळखली जाते..मला जाऊन ५८ वर्ष लोटली. अनेक अनुयायी मला वंदन,अभिवादन करण्यासाठी येतात.त्यातील काही अगदी निस्सीम हृदयातील आतील कोपऱ्यातील ठेवणीतील जागा माझ्यासाठी कोरून ठेवली आहे.ते अनुयायी जगाच्या,भारताच्या विविध कानाकोपऱ्यातूनयेतात तासंतास रांगेत उभे राहूनमला नद्मस्तक होतात.मात्र
काही जण येतात ते मात्र स्वतःचा स्वार्थसाधण्यासाठी स्वतःचा आर्थिकहेतू साधण्याकरिता येतात.येऊन
काही काळ केवळ स्वतःची दुकाने मांडून उभे राहून जातात .अनुयायी हो,मी आपल्यास सांगितले होते कि,
माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा मी जे जीवनात सोसून आपल्याकरिता महामार्ग
देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या रथाला पुढे घेऊन जाण्याचा संकल्प करा परंतु तसे करताना होताना काहीच दिसत नाही मला आता काही अनुयायी 'देव'मानायला लागलेत.माझ्या नावावर आर्थिक प्राप्ती करून स्वतःचा उदर निर्वाह करायला लागलेत.माझ्या नावाचा गैरवापर करून या डॉ.बाबासाहेबाला,देशाच्या
घटनाकाराला,जगाच्या पाठीवर असलेल्या बुद्धीवांताला केवळ मागासलेल्या,उपेक्षित लोकांचा मसीहा म्हणून ओळखू जाऊ लागले आहे. याला कारणीभूत जबाबदार कोण?अरे गद्दरानो तुम्हीच? आपण सर्व
येता स्मृतिदिनाला अर्थात मला अभिवादन वंदन करण्यासाठी?मात्र कसे येताहो, हसत खेळत बागडत,
जत्रेच रूप देत नको ते उद्योग करता जर माझ्या स्मृतिदिनाला जत्रेच स्वरूपआणत असाल तर याद राखा. यापुढे पाय पवित्र चैत्यभूमीवर ठेवूच नका.मी आपला उद्धारकर्ता आहे. असे आपणास उमजून माहित
असताना देखील एक दुःखाचा दिवस मौन बाळगून गांभीर्य ओळखून शांत पायाकडेअर्थात खाली बघून चालू शकत नाही का?कसले हो, भीमसैनिक लाज वाटायला हवी ?तुम्हाला शरम वाटली पाहिजे? मला केवळ
तुम्ही आपलाच 'बाबा' म्हणून सीमित करून टाकलाय. आमचा बाबासाहेब? आमचा आंबेडकर ?एकच साहेब
बाबासाहेब? काय चाललाय काय?अरे माझ्या लेकारानो, मी आपला आहेच. परंतुआधी या भारताचा,या जगाचा आहे हे जाणून घ्या.ज्या भारताची राज्यघटना लिहिली.या जगाने दोनशेवर्षाच्या इतिहासातबुद्धीचा एकमेव महामेरू म्हणून गौरव केला. त्याचा अशा प्रकारे ६डिसेंबरला अर्थातमाझ्या स्मृतीदिनाला महाजत्रेच,तीर्थ
यात्रेच रूप आणता. व माझ्या नावाला हसण्याची वेळमनुवादी लोकाकडूनआणता.तुम्हाला गायीच्या पाडसाप्रमाणे हंबरणे सुद्धा त्याकाळी कठीण होते. तिथेवाघासारखी डरकाळी फोडण्यासाठी तुम्हाला माणसात
आणले .पण आजही ६ डिसेंबरला स्मृतिदिनाला डरकाळी काय मोठयान खिदलताय काय?मोठयाने हसताय काय?एका दिवसाला आपल्या तोंडाला आवर घालू शकत नाही.कशाला माझा स्मृतीदिवस साजरा करता आहात?.या पुढे थांबा.करूच नका ?अनुयायीहो,अरे तुमच्या स्वतःच्या घरी जेंव्हा स्वतःचआई, बाप,नातेवाईक मरण पावल्यावर स्मृतिदिन साजरा करताना मोठयाने हसणेखिदळणे, लाऊड स्पीकर लावूनगाणी लावता काय?जत्रा भरवता काय? नाही ना ? मगबौद्ध धम्माच्या रीतीरीवाजानेतो विधी पार पाडता.अरेमाझ्या स्वतःच्या कुटुंबाची पर्वा नकरता तुम्हाला माणसात आणूनसमानता निर्माण करू दिली.समतेच्या महामार्गावर आणून सोडले.आणि ६डिसेंबरला माझ्या स्मृतीदिनाला,ज्यांना मी म्हटले होतेकी,माझ्या एक शाहिराच गाणं हेमाझ्या दहा भाषणा बरोबर आहे.असे असताना या दिवशी महाराष्ट्रातीलसर्वच आघाडीचे शाहीर, गायक शिवाजीपार्कवर स्वतःचगाण्यांनाच दालन नको तेवढ्या आवाजात वाजत गाजत उभं करून मला चैत्यभूमिवर अर्थात सरणावर जाळण्याकरिता ठेवला होतं अर्थात कायमचाच गाढनिद्रिस्त अवस्थेत
झोपी गेलो होतो ती जागा सुद्धा त्या आवाजानदुभंगली जात आहे. एवढा कर्कश आवाज त्या ठिकाणी होतो याला कोणतेस्वरूप म्हणावे? हा आनंदाचा दिवस की दुःखाचा दिवस सांगा ना?ही तर जत्राच भरली आहे ,तमाशाचहोतो आहे.अगदी सहज वाटते.एखाद्याने विचारले की हा कोणता दिवस आहे हो, आपण काय , कशाकरिता करीत आहात तर त्याचा द्वेष, राग करून म्हणतोस की,आम्ही बाबासाहेबांना अभिवादन
वंदन करीतआहोत,करायला आलो आहोत. म्हणून भोंगा गाणी,भाषण करूनसाजरा करीत आहोत.अरे
माझी जयंती १४ एप्रिलला असते, ६डिसेंबरला नाही.अनुयायीहो, इतर भारतीयलोकांना माझ्या विज्ञान
विचाराला, स्मृतीदिनाला वंदनकरायला यायचे असते. मात्र आपणचअसे प्रकार करून माझ्या नावाला,
बाबासाहेब आंबेडकर हे आमचेच केवळ'बाबा' म्हणून जगजाहीर करून मोकळेचकेलेआहे .कृपया मानसिकता बदला अन्यथा मनुवादी विषमतावादी जावूद्या हो,परंतु मला शंका आहेच येत्याकाळातआपलेच स्वतःला बौद्ध ब्राम्हणसमजणारेसुद्धा माझ्या स्मृती दिनाला येणारनाहीत . विचारकरा हा मांडलेला बाजार,जत्रेच स्वरूप बदलून काही तरी नाविन्यअर्थात मौन बाळगून स्मृती दिन साजरे करायचे असतात.तुम्ही आता मागासलेले नाहीत त्यातून बाहेर काढून तुम्हाला नवीन विचार दिले आहेत. त्याप्रमाणे वाटचाल करा, चाला वरसांगितल्या प्रमाणे स्वतःच्या आई वडिलांचे र बुद्धाला अनुसरून स्मृतीदिन साजरे करता तसाच माझा करा. बुद्ध वंदना घेऊनच.प्रथम गायक शाहीरओर्केष्ट्रा यांना ताळ्यावर आणून शांतता प्रस्थापित करा. एवढे दिवस सहन केले
आता माझी सहनशीलता संपलेली आहे .माझ्या नावावर आतापर्यंत आणि येणाऱ्या काळात सुद्धा आर्थिक बाजू मजबूत केली आहे.करणार आहात व कराच. परंतु माझ्या स्मृतीदिनाला यासर्व प्रलोभन पासून एक दिवस तरी वंचित रहा. मौन, शांत येऊन वंदन करूनजा .आजपर्यंत स्मृतीदिनाला येणारा हा केवळ
खालच्या वर्गातील अनुयायी आहे.परंतु येणाऱ्या काळात माझ्या स्मृतीदिनाला येणारा अनुयायी हा प्रत्येक
वर्गातील असावा.तो येईल त्यासाठी तरुणांनी प्रयत्नशील रहा ,शिस्थ बंधन नियम याचे पालन करून शिवाजीपार्कला अर्थात चैत्यभूमीचा परिसर हा शांततामय कसा राहील याचा शोध घ्या.
आजकाल काही सरकारी,नेते मंडळी माझ्या स्मृतीदिनाला माझ्या स्तुपावर आणि जमलेल्या अथांग जनसमुदायावर घिरट्या घालणाऱ्या छोट्या विमानातून पुष्पवृष्टी करीत आहेत हे अतिशय चुकीचे असून त्याला तीर्थस्थाननिर्माण करण्याचा षड्यंत्र राबविले जात आहे. त्यावर उपाय करा आणि त्यावर बंदी आणा.त्याचप्रमाणे मला अभिवादन करण्यासाठी येणारे स्वार्थी नेतेअभिवादनसभा या नावाखाली हसत खिदळतमनुवादी विचारांच्या लोकांना आणून समोर बसलेल्या अडाणी लोकांना नको ती आश्वासने देत भूलथाप्पा मारून नको ते विचार देवून समाजाला फसविण्याचे धोरण आखत आहेत. अशांना रोखूनमाझ्या विचाराने चालणारा समाज घडवा असे निक्षून सांगणारे तरुण घडवा ,जागृत ,उठावकरणारे तयार व्हा बदल नक्कीच होईल. स्मृतिदिन हा शिस्तबद्ध पद्धतीने घडविण्यास तुमच्या सारखा समर्थनीय तरुणच हवाच हे सर्व तुमच्याच हातात आहे.रक्त माझेच आहे ते केवळ रक्त वापरा नसा आपोआप तयार होतील. रक्ताभिसरण
झाल्याशिवाय राहणार नाही.अर्थात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.प्रथममाझ्या स्मृती दिनाला शाहीर,
गायक यांच्या आवाजाला शांत करा त्यांना शांतपणे स्वताच्या ध्वनिफितीचे विकण्यास मुभा द्या, प्रवृत्त करा ,नेत्यांची भाषणे माझ्या स्मृतीच्या दिवशी नकोच यासाठी प्रयत्न करा.त्यांना सांगा एकदिवसी मौन बाळगा. अभिवादन केवळ वंदन करून निघून जा.असा सांगणारा तरुण वर्ग निर्माण करा. नक्कीच बुद्धांनी सांगितल्या प्रमाणे शांततेत माझा स्मृतिदिन पार पडेल.सुरवात करा मी नक्कीच तुमचा पालन उद्धार  कर्ता कायमचाच राहीन.
माझ्या स्मृतीदिनी अर्थात सहा डिसेंबर महापारीनिर्वान दिन महाराष्ट्रातील शाहीर, गायक , नेते  मंडळीं आणि अनुयायी आपण सर्व मोठ्या अभिमानाने अभिवादन करण्यासाठी येत  असता मी कायमचा सरणावर
निजलेला जगाचा महान बुद्धिवंत प्रकांडपंडित बोधिसत्व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा मोठ्या बिरुदावल्या नावाच्या समोर आहेत. असे असताना मात्र हे ५ तारखे पासून लावलेल्या शाहिरांच्या गायकांच्या आणि मला अभिवादन  करण्याच्या नावाने नेत्यांच्या सभा यांचा ध्वनी जमीन हादरवणारा कर्कश
भोंग्याच्या आवाजाने स्वतःच मौन बाळगून उघड्या डोळ्याने चित्र बघून  मी सांगितल्या प्रमाणे
माझ्या नावाचा गजर करण्यापेक्षा स्वतःचा आणि समाजाचा उद्धार करण्यासाठी झटा.मला अशा तुमच्या किळसवाण्या प्रकाराने तुमचा तिरस्कार वाटायला लागलाय.माझे महापारीनिर्वान होऊन केवळ माझ्या नावाने गेली ५६ वर्ष अक्षरशा धुडघूस घालून समाज विखुरला गेला आहे.तुम्ही केवळ एक दिवस मौन बाळगून शांत राहवून अभिवादन करण्याची किमया साधू शकत नाहीत.हा शरमेने मान  खाली घालायला लावणारा प्रकार
नाही तर काय ? अनुयायीहो,या पुढे माझ्या निर्वाणदिनी चैत्यभूमीवर असे प्रकार होत असतील तर येऊच
नका. माझ्या नावावर हजारो रुपये कमवायचे असतील ,हिंदू धर्माला नाकारणारा मी अशा धर्माचे अनुकरण करून माझ्या महापारीनिर्वाना ला जत्रेचे महारूप देत धिंगाणा घालत असाल तर येऊच नका.मी झिजलो झटलो ते तुमच्या उद्धारासाठीच पण माझ्या नावाचा मेल्यानंतर कायमचा उद्धारच करून टाकला आहे.
माझ्या नावाने मनुवादी आधीच पिसाळलेला होता. आज माझ्या नावाचा तिरस्कार तुम्ही जास्त करून द्यायला लागले आहात.लक्षात ठेवा मला सीमित करू नका मी या देशाचा आहे या जगाचा आहे अशी माझी ओळख
असताना माझ्यावर मर्यादा टाकू नका .
माझ्या महापारीनिर्वाना ला येणारा अनुयायी हा धर्मनिरपेक्ष असला पाहिजे म्हणून आपणास मी जाहीरपणे सांगितले आहे "मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटचा श्वास असे पर्यंत भारतीय आहे हे आपण
विस्र्वायला लावत आहात मला केवळ बौद्ध धम्मात सीमित करू नका तुम्हीच म्हणता ना महामानव
युगपुरुष जन्मतात ते कोणा एका धर्माचे ,जातीचे नसतात मग असे आपण का करीत आहात .मला मान्य आहे मी तुमचा मार्गदाता उद्धारकर्ता आहे मी बौद्ध धम्म स्वीकारला आहे.त्याच बरोबर तुम्हीही स्वीकारला आहे .पण मी या भारताचा आधी नागरिक आहे अर्थात मी देशाचा भारतरत्न आहे. या जगाचा विश्वरत्न आहे.
याचा विसर तुम्हाला होता कामा नये .. माझे विचार इतरांना सांगून बुद्धाचा धम्म किती महान आदर्श
आहे. हे पटवून द्या तरच सारा भारत बौद्धमय होईल .परिवर्तन झाले की अवघा भारत माझ्या ६ डिसेंबर
अर्थात महापारीनिर्वान स्मृती दिनाला नद्मस्तक होण्यास येईल .त्याचवेळी चैत्यभूमीला खऱ्या अर्थाने
महत्व प्राप्त होईल .म्हणून' सीमेला सीमित करून ठेवण्यापेक्षा सीमेचे उल्लघन केल्याशिवाय त्या जागेला महत्व प्राप्त होणार नाही' . म्हणजेच बाबासाहेब हे केवळ बौद्ध, उपेक्षित मागासलेल्या समाजाचे नसून ते
काश्मीर ते कन्याकुमारी या अन्खंड भारताचे बाबा आहेत. हे जाणवून देण्याची जबाबदारी तरुण
हो तुमच्यावर आहे. 
जयबुद्ध जयभारत! 
लेखक : धम्मबांधव 
राजेश सावंत-
( चेअरमन - 'आसरा 'एज्युकेशन आणी सामाजिक संस्था). 

1 comment: